Aangan aayi hai aayi only on Marathi Zee5 from 24 July 2026

हृता दुर्गुळे, रेणुका शहाणे आणि निर्मिती सावंत यांनी साजरा केला कुटुंबातील नात्यांचा सुंदर प्रवास मराठी Zee 5 वर ‘अगं आई अहो आई ‘ वेब मालिकेतून उलगडणार सुंदर प्रवास ….

हृता दुर्गुळे, रेणुका शहाणे आणि निर्मिती सावंत यांनी साजरा केला कुटुंबातील नात्यांचा सुंदर प्रवास मराठी Zee 5 वर ‘अगं आई अहो आई ‘ वेब मालिकेतून उलगडणार सुंदर प्रवास ….

“अगं आई अहो आई “ वेब मालिकेतून उलगडणार सासू आणि आईच्या नात्याची सुंदर गोष्ट !

Mumbai: मराठी Zee 5 ने आपल्या आगामी ओरिजिनल मालिकेचा ‘अगं आई अहो आई’ चा अधिकृत ट्रेलर प्रदर्शित केला असून हृता दुर्गुळे, रेणुका शहाणे आणि निर्मिती सावंत यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही मनाला भिडणारी कौटुंबिक मालिका आहे. वरुण नार्वेकर दिग्दर्शित, कल्याणी पंडित लिखित आणि जिओ स्टुडिओज, बहावा एंटरटेनमेंट तसेच प्रतिसाद प्रॉडक्शन्स निर्मित, ही मालिका एका मुली, तिची आई आणि तिची सासू यांच्यातील दुर्मिळ आणि सुंदर नात्याचा प्रवास साजरा करते.
कुटुंब एकत्र आलं की प्रेम अधिक फुलतं, हे या कथेतून अधोरेखित होतं. ही ओरिजिनल मालिका २४ जुलै २०२६ पासून केवळ मराठी Zee 5 वर प्रदर्शित होणार आहे.
अगं आई अहो आई ही नातेसंबंध, स्वीकार आणि मानवी जिव्हाळ्याची ताकद साजरी करणारी हृदयस्पर्शी कौटुंबिक मालिका आहे. पुणे आणि कोल्हापूर या दोन भिन्न विश्वांच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही कथा एका नवविवाहित तरुणीची आहे, जी नव्या कुटुंबात स्वतःचं स्थान शोधताना बदलणारे नातेसंबंध आणि भावनिक टप्प्यांचा अनुभव घेते. लग्नानंतर प्रत्येक मुलीसमोर एक न बोलला जाणारा प्रश्न उभा राहतो—आईशी असलेलं नातं जपत नव्या आयुष्यातील दुसऱ्या आईला स्वीकारण्याचा. मात्र अगं आई अहो आई या विषयाकडे एक ताज्या आणि सकारात्मक दृष्टिकोनातून पाहते. स्पर्धा, अपेक्षा किंवा दोन नात्यांमध्ये निवड करण्याऐवजी ही मालिका अशा जगाची ओळख करून देते, जिथे एका स्त्रीला आई आणि सासू यांच्यात निवड करावी लागत नाही. आई आणि सासू यांच्यातील जिव्हाळ्याच्या नात्यामुळे तिला एक आई गमावल्याची भावना न येता, आणखी एक आई मिळाल्याचा आनंद अनुभवायला मिळतो. वास्तववादी पात्रं आणि भावस्पर्शी क्षणांमधून ही मालिका सहानुभूती, विश्वास आणि परस्पर समजूतदारपणा कुटुंबाला अधिक जवळ आणू शकतो आणि घराला खरं घरपण देऊ शकतो, हे अधोरेखित करते.अगं आई अहो आई ही वेब मालिका नायिकेच्या भावनिक प्रवासाची झलक दाखवते. पुण्यातील तिचं परिचित आयुष्य मागे सोडून ती कोल्हापूरमध्ये नव्या आयुष्याची सुरुवात करते. नव्या परंपरा, अपेक्षा आणि वातावरणाशी जुळवून घेत असताना ती आपल्या नव्या कुटुंबाशी अर्थपूर्ण नाती निर्माण करते आणि स्वीकार हा सहानुभूती व परस्पर आदरातूनच मिळतो, हे शिकते.
या कथेच्या केंद्रस्थानी सून आणि सासू यांच्यात हळूहळू विकसित होणारं नातं आहे. सुरुवातीची अनिश्चितता मैत्री, साथ आणि समजूतदारपणात रूपांतरित होत पारंपरिक साचेबद्ध कल्पनांना आव्हान देते. तसेच नायिकेची आई आणि सासू यांच्यातील उबदार मैत्री आधुनिक कौटुंबिक नात्यांचं एक वेगळंच आणि ताजं चित्र उभं करते.
दिग्दर्शक वरुण नार्वेकर म्हणाले “वर्षानुवर्षे लोकप्रिय कथांमध्ये सासू-सुनेचं नातं प्रामुख्याने संघर्षाच्या नजरेतून दाखवलं गेलं आहे. अगं आई अहो आई मध्ये मला सर्वात जास्त उत्साह वाटला तो म्हणजे समजूतदारपणा, सोबत आणि भावनिक प्रगल्भतेवर आधारित एक वेगळी कथा सांगण्याची संधी. ही मालिका आपल्याला सांगते की, कुटुंबातील नाती ही केवळ नात्यांच्या नावावर नव्हे, तर स्वीकार, जिव्हाळा आणि रोजच्या छोट्या क्षणांमधून घडत असतात”
रेणुका शहाणे म्हणाल्या “मला अगं आई अहो आई मध्ये सर्वात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे पडद्यावर क्वचितच पाहायला मिळणारं एक नातं—आई आणि सासू यांच्यातील मैत्री. एक आई म्हणून आपल्या मुलीला तिच्या नव्या आयुष्यात प्रेम, समजूतदारपणा आणि आधार मिळावा, अशी प्रत्येक आईची इच्छा असते. ही कथा अतिशय सुंदर पद्धतीने दाखवते की मुलगी एक कुटुंब गमावत नाही, तर आणखी एक कुटुंब आणि कदाचित आणखी एक आई मिळवते. या स्त्रियांच्या नात्यातील ऊब, विश्वास आणि परस्पर आदर हीच या मालिकेची खरी ताकद आहे आणि प्रेक्षकांनाही ती नक्कीच जवळची वाटेल”
निर्मिती सावंत म्हणाल्या, “मला अगं आई अहो आई मधील सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे अनेक वर्षांपासून पाहत आलेल्या साचेबद्ध कथनपद्धतीला ही मालिका छेद देते. सासू-सुनेमधील संघर्ष, वर्चस्व किंवा अहंकार याऐवजी ही मालिका एका प्रेमळ, जिव्हाळ्याच्या नात्याची शक्यता साजरी करते. लग्न म्हणजे मुलीने एक कुटुंब गमावणं नव्हे, तर तिला आणखी एक आई मिळणं, हा विचार अतिशय सुंदरपणे मांडला आहे. परस्पर समजूतदारपणा, आदर आणि प्रेम यावर उभ्या असलेल्या या नात्यांमुळे ही कथा ताजी आणि मनाला स्पर्श करणारी वाटते. या प्रवासातला आशावाद आणि ऊब प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भिडेल.”
हृता दुर्गुळे म्हणाली, “या कथेकडे मला सर्वप्रथम आकर्षित केलं ते तिच्या प्रामाणिकपणाने आणि आजच्या काळाशी असलेल्या जवळिकीने. माझी व्यक्तिरेखा लग्नानंतर अनेक तरुणींप्रमाणेच आशा, भीती आणि अनेक प्रश्न घेऊन नव्या कुटुंबात प्रवेश करते. पण नेहमीच्या साच्यातील कथा न सांगता, तिचा प्रवास हा आधार, मैत्री आणि आपलेपण शोधण्याचा आहे. विशेषतः तिच्या सासूसोबत निर्माण होणारं सुंदर नातं आणि तिचा भावनिक प्रवास प्रेक्षकांना नक्कीच आपलासा वाटेल.”
ऊबदारपणा, विनोद आणि प्रत्येक कुटुंबाला जवळचा वाटणारा अनुभव घेऊन येणारी अगं आई अहो आई ही मालिका कुटुंब, स्वीकार आणि घरपणाची भावना देणाऱ्या नात्यांचा उत्सव आहे.
“अगं आई अहो आई” २४ जुलै २०२६ पासून केवळ मराठी Zee 5 वर बघायला विसरू नका !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Releated

JIOSTAR MAKES THIS FESTIVE SEASON BIGG, BRINGING TOGETHER SIX BIGG BOSS EDITIONS ACROSS INDIA; UNVEILS INDIA’S BIGG REALITY COFFEE TABLE BOOK

Print 🖨 PDF 📄 eBook 📱JIOSTAR MAKES THIS FESTIVE SEASON BIGG, BRINGING TOGETHER SIX BIGG BOSS EDITIONS ACROSS INDIA; UNVEILS INDIA’S BIGG REALITY COFFEE TABLE BOOK New seasons of Hindi, Tamil, Telugu, Kannada, Malayalam and Bangla editions of Bigg Boss to be launched this festive season starting September Trusted by 625+ brands across 46 categories […]